महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आहे हा किल्ला तब्बल ४८ एकर इतका पसरलेला आहे 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाची स्थापना झाली. तसेच पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये प्रमुख उत्पादन आंबा, काजू, नारळ, मासे, कलिंगड, ऊस, सुपारी, तांदूळ, रातांबे ही खूप जास्त प्रमाणात उत्पादित होतात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमुख फळ किंवा उत्पादन हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होते पण मालवण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारे सर्वच प्रकारचे फळे व इतर गोष्टी समप्रमाणामध्ये उत्पादित होतात हे या तालुक्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे.