महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या अरबी समुद्रात असणाऱ्या कुरटे या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आहे हा किल्ला तब्बल ४८ एकर इतका पसरलेला आहे 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाची स्थापना झाली. तसेच पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये प्रमुख उत्पादन आंबा, काजू, नारळ, मासे, कलिंगड, ऊस, सुपारी, तांदूळ, रातांबे ही खूप जास्त प्रमाणात उत्पादित होतात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमुख फळ किंवा उत्पादन हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होते पण मालवण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारे सर्वच प्रकारचे फळे व इतर गोष्टी समप्रमाणामध्ये मालवण तालुका व शहरामध्ये सर्वात जास्त प्रेक्षणीय स्थळे पहावयास भेटतात यामध्ये जय श्री गणेश मंदिर, (सोन्याचा गणपती), श्री देवी भराडी आई मंदिर आंगणेवाडी, श्री देवी सातेरी जलमंदिर बिळवस, इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर आचरा ही प्रमुख मंदीरे आहेत. तसेच तालुक्यामध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत त्यापैकी चिवला, तारकर्ली, देवबाग व तोंडवळी या ठिकाणी पर्यटकांची खूप प्रमाणात वर्दळ असते.
मालवण तालुक्याचे एकुण भौगोलीक क्षेत्रफळ 61,835 हेक्टर एवढे आहे. एकुण गावांची संख्या 135 एवढी आहे. ग्रामपंचायतींची संख्या 65 आहे. तसेच तालुक्यामध्ये 187 प्राथमिक शाळा आहेत. तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्र 31,314 हेक्टर एवढे आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पर्जन्यमान 3760 मि.ली. एवढे आहे. तालुक्यामध्ये आचरा, चौके, हिवाळे, मसुरे व गोळवण ही पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व 34 उपकेंद्रे आहेत. तसेच 8 पशुवैदयकीय दवाखाने कार्यरत आहेत.
तसेच या पंचायत समितीमार्फत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, कुंटुंबकल्याण शस्त्रक्रिया, प्रधानमंत्री आवास योजना, सुधारीत चुलींची मांडणी, जिवनधारा विहीरी बांधकाम/ जवाहर विहीरी, शालेय पोषण आहार योजना, बायोगॅस सयंत्र मांडणी, या प्रकारच्या योजना राबविल्या जातात.